Thursday, 1 March 2012

औरंगाबाद बैठकीची शांताराम पंदेरे यांनी घेतलेली टिपणे


परिवर्तन चळवळीपुढील सामायिक आव्हाने व पेच
७ जानेवारी, २०१२, कॉ. व्ही. डी. देशपांडे सभागृह, सिडको,
औरंगाबाद बैठकीची मिनीटस
मुख्य मुद्दे

१)  राजकीय हस्तक्षेपाची ताकद व व्यापक एकजुट

१.१) आपापल्या जनसंघटना

१.२) पुरोगामी राजकीय पक्ष व त्यांच्या राजकीय आघाड्या

१.३) अन्य सामाजिक, सांस्कृतिक आघाड्या

 

चर्चेचे उपमुद्दे
१)   मुद्यांवरचे लढे राजकीय ताकदीत रूपांतरीत होताना दिसत आहेत कां? नसतील तर त्याची कारणे काय?
२)   पुरोगामी शक्तींच्या एकजुटीसमोरील आव्हाने कोणती?
३)   सैंद्धातिक दिशा किंवा विचारधारा आजच्या संदर्भात तपासण्याची गरज आहे काय? असल्यास कशाप्रकारे?
४)   वर्गिय जाणिवा जाग्या होताना दिसत आहेत कां? दिसत असल्यास कशाप्रकारे? नसल्यास त्याची कारणे काय?

शांताराम पंदेरे: चर्चेसाठी काही मुद्दे
वास्तव आणि भुमिका
Ø गांव-वस्ती-तांडा-पालांवर लोक आपापल्यापरिने आपापल्या ख-या प्रश्नांवर स्वत:च्याच नेतृत्वाखाली संघर्ष करीत आहेत.
Ø यातील काही मुद्दे सार्वत्रिक स्वरूप घेऊ शकतात.
Ø त्यांना आपापल्या विचार-राजकीय प्रक्रियेमध्ये आणण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करीत असतात.
Ø महाराष्ट्रात परिवर्तनवादी राजकीय शक्ती-पक्ष यास्वरुपाची प्रक्रिया करण्यात कमी पडतात.
Ø विचार, मुद्दा-कार्यक्रम, नेतृत्व, संघटन, चळवळीचे मार्ग-प्रक्रिया, साधन-सामुग्री आणि राजकीय सत्तेवरील प्रभाव, तसेच ती ताब्यात घेण्याची व्युहरचना याचा अनुभवसिद्ध विचार आणि भुमिका याचा संपुर्ण अभाव आहे.
Ø स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्र, दुष्काळ व रोजगार हमी, जमीन-जंगल-पाणी आणि गौण वनोपज, नामांतर, भ्रष्टाचार, अन्याय-अत्त्याचार, लोक विरोधी शासन-प्रशासन, आदि प्रश्नांवर राजकीय शक्ती उभी राहुन त्याचा थेट प्रभाव राजसत्तेवर पडु शकला असता. पण १९८०-पुलोद, १९९३-९५ बहुजन श्रमिक समितीचा प्रभाव म्हणुन आलेले पहिले कॉंग्रेसेतर भाजप-सेना युतीचे सरकार या राजकीय प्रक्रियेकडे गांभिर्याने पहाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र पाहिले गेले नाही. 
Ø एक पक्षीय राजवट जाऊन बहुपक्षीय आघाड्या अस्तित्वात येणे; राज्यनिहाय बहुजन वर्ण-जातींच्या चळवळी-पक्ष-संघटना उभ्या रहाणे आणि नव्या जागतिकीकरणाच्या आर्थिक प्रक्रियेचे होणारे परिणाम, यांचा परस्पर जैवीक संबंध आहे.
Ø अस्तित्व-अस्मिता-आत्मसन्मान-आत्म जाणीव या अवस्थेकडे कसे पहाणार? त्या नेहमीच जनविरोधी-लोकशाहीविरोधी मानल्या गेल्या. त्याचा फायदा फक्त भाजप-कॉंग्रेस आणि प्रादेशिक –बहुजनवादी पक्षांनी घेतला.
Ø त्याचवेळी समाजवादी-साम्यवादी पक्ष-चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांचा अपवाद आहे. फुले-आंबेडकर-लोहियावादी पक्ष प्रभावीपणे पुढे येत आहेत.
Ø आज सर्वच पक्ष सत्ताधारी बनुन अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे सत्तेची ऊब सर्वांनाच आहे. ही चांगली अवस्था आहे.
Ø सत्तेचा समतोल आज या बहुजन –प्रादेशिक-पक्षांच्या हाती आहे. ही चांगली बाब आहे.
Ø १९६७ नंतरच्या पक्षबाह्य बिगर संसदीय राजकीय चळवळी, १९७८ नंतरची कॉंगेसेतर पक्षांचा कालखंड, मंडल-नामांतरोत्तर कालखंडातील स्वयंसेवी संस्था-बिगर सरकारी संघटनांचा कालखंड, महिला-दलित, आदिवासी-भटके-विमुक्त-ओबीसी-मुस्लिम-ख्रिश्चन-बौद्ध जनसमुहांच्या प्रश्नांवरील आंदोलने, आताची मध्यमवर्गिय-माध्यमप्रधान, कायदा केंद्रित आंदोलने (नागरी संघटना), याकडे पहाण्याची दृष्टी ---
Ø प्रश्न आहेत--------------
१)   विचारसरणीच्या नावाखाली बदलाच्या प्रक्रियेला समजुन घेण्याची मर्यादा
२)   वर्ण-जात-लिंग आणि साधनसामुग्रीच्या अभावी बहुजन नेतृत्वाला स्विकृती नाही.
३)   राजकारणाचा बदलता पोत आवाक्यात येत नाही म्हणुन काही महत्वाच्या मुद्यांना अधिक महत्व दिले जात आहे.
४)   राजकीय पर्याय देण्याची महत्वाकांक्षा कुणाकडे आहे? पक्ष-संघटना, नेते, कार्यकर्ते
५)   राजकीय शक्ती / पर्याय कसा उभा राहिल?
५.१) भुमीका – कार्यक्रम-उपक्रमांवर शक्यतो संवाद घडवावा.
५.२) बिगर राजकीय संघटना-व्यक्ती-गटांची शक्ती उभी करावी.
५.३) एकजुटीचे कार्यक्रम-उपक्रम घडवावेत .
५.४) सत्ता, विविध पक्ष आणि आपण संबंध ठरवावेत.
५.५) राजकीय पक्षांशी संवाद घडवावा.
५.६) कॉंग्रेस, भाजप केंद्रित की, पर्यायी शक्ती उभारावी?

कॉ. भालचंद्र कान्गो
Ø १९७७-७८ ला कोणते मुद्दे होते?
Ø आता सत्ता बदलण्यापेक्षा good governance हा आता प्रश्न आहे?
Ø अराजकीयीकरण का झाले?
Ø प्रादेशिक पक्ष आणि आविष्कार
Ø कॉंग्रेस-भाजप वगळुन मग कोण?
Ø डावा पर्याय म्हणुन पाहिले जायचे-
Ø आता certainty वाटत नाही—
Ø म्हणुन या चर्चेचे मी स्वागत करतो-
Ø “विचारवेध” एका प्रश्नाभोवती
Ø चळवळीला समजुन घेऊन आपल्या राजकारणाचा भाग कसा बनवायचा?
Ø विकासाची अवधारणा यावर विचार हवा---
Ø Challenge—120 कोटिच्या भारतात जगात जे घडत आहे ते येथे घडणारच—उदा_ शेतीवरील भार कमी होणार—शहरीकरण होणार---असुरक्षीत काम मिळेल—industry-urban model उपयोगी पडेल कां?
Ø लोकांना गांधीवादी मॉडेल नको---त्यांना नवीन शहरी मॉडेलचे आकर्षण आहे---
Ø Employment हा मोठा प्रश्न—खाजगीकरण पुर्णपणे टाळुन विकास शक्य आहे कां?
Ø म्हणुन विकासाच्या मुद्यावर सहमती उभारावे—सहमतीच्या मुद्यावर चर्चा घडविण्यासाठी
Ø सगळीकडे वळण Rightworldship कडे आहे---तेव्हा उजव्या प्रतिगामी शक्ती उफाळुन येतात---युरोपसह सर्वत्र संकट येत आहे.
Ø अराजकीयीकरणाकडे सरकण्याचा धोका मोठा आहे----

उल्का महाजन
विकासप्रश्नावर लवकरच एकवाक्यता यायला हवी---
SEZ च्या धोरणासह चौकटीला विरोध हवा---
Region
Delhi-Mumbai Industrial Western Corridor-14% लोकसंख्या बाधित होणार आहे. कामगार कायदे लागु नाहीत—spl. Purpose vehicle स्थानीक स्वराज संस्था बरखास्त---निर्णय spv पहाणार---त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करणार--- सिंचीत आणि पाण्याचा भाग घेतला जाणार---- विकास हवा पण या सवरूपाचा नको—
Manufacturing Industry Policy------
शेती सह संविधानाला हात घालणार आहेत----
म्हणुन या धोरणाला हात घालायचा की, सुट्या सुट्या मुद्याला हात घालायचा?
परिवर्तनाचा वाहक कोण? असंघटीत वर्ग –शेतीतील समुह ----

डॉ. मंगल धारवाडकर
पाण्याचा मुद्दा महत्वाचा ---

कॉ. भिमराव बनसोड
आपल्या सर्वांच्या विविध राजकीय छटा आहेत---तरीही एकत्र येण्याचा विचार   स्वागतार्ह----हा काही पहिला प्रयोग नाही---पण अनुभव काही तसा नाही---लानिप-भारिपबमसं चा प्रयोग चांगला पण त्याला पुढे निवडणुकीपुरता राहिला व मतभेद झाले---
पण हा उपक्रम चांगला---
राजकीय एकजुट-प्रभाव म्हणजे काय? हेतु काय?
माणगांव चर्चेतुन काही स्पष्ट होत नाही—
एकजुट काही प्रश्नांवर आहेच---ताकदीप्रमाणे कार्यरत आहोत---म्हणुन निराशाजनक स्थिती नाही----
परिवर्तनवादी कार्यकर्त्याममध्ये निराशाजनक निर्माण होणार नाही हे पाहिले पाहिजे---
आण्णा हजारेंचे आंदोलन अनेक मतभेद—पण लोकसभेकडे सर्वाचे लक्ष गेले हे खरे---लोकांनी खरेच लक्ष दिले गेले ही जमेची बाजु—जनतेचा हा सहभागच आहे---
अनेक कायदे होऊन गेलेही---त्याकडे लक्षही गेले नाही---
१९९१नंतर कामगार चळवळ बचावात्मक झाली----पण शेतकरी आंदोलने झाली--- या आंदोलनांमध्ये पुढाकार उजव्या शक्तीच करतात----
लोकांची भावनाच तशी होत आहे---येथे कामगार कृती समिती---API चे कामगार खासदार खैरे, दर्डाकडे गेले----आपल्याकडे आले नाहीत---कारण ते सत्तेत आहेत म्हणुन ---व्यावहारिक विचार केला गेला—
म्हणुन आपण हतबल आहोत---
विकास ---प्रारंभी सर्वांनी शेतक-यांनी विरोध केला नाही---आता त्यांच्या लक्षात आले कि, विकास आमचा होत नाही.
आता प्रश्न विचारत आहेत---विकास कुणाचा? म्हणुन लोकांचा SEZ ला विरोध करतात—
आता आंदोलन आहेत—पण leading part उजव्यांचा आहे. ते उघड होणार आहे. म्हणुन डाव्या-परिवर्तनवाद्यांचा प्रभाव वाढला पाहिजे.
कामगारवर्गाने गावाकडे जाऊन संघटीत केले पाहिजे. पण कामगारवर्गच क्रांती करणार आहे याविषयी शंका नाही---
कंत्राटी कामगार संघटना उभारणी आवश्यक—तोही औद्योगिक कामगार आहे---चीन
रशिया दुसरीकडे गेले म्हणुन भांडवलीविचारसरणी महत्वाची –त्याचे घेणे देणे नाही---
तोच पर्याय हे घातक---
मार्क्सवादात भर घातली पाहिजे---त्यांचे स्वागत केले पाहिजे---
तंत्रज्ञानाचा वापर करावा---
आधुनिकिकरणाला विरोध नाही---

एड. विष्णु ढोबळे
विद्रोही-विनिश-विचारवेध-त्यांना पुढे न्यावे---
साहित्य-सांस्कृतीक-चळवळीत पुढे गेले पाहिजे----
आपले राजकारण crisis मध्ये आहे---आताचे state आपली मिलिट्री लोकांच्या विरोधात
वापरली जात आहे---म्हणुन state कळले पाहिजे---तरच डावपेच कळतात----
अमेरिकेचे dominating politics चालवायचे आहे---
राजकारण हिच किल्ली आहे---महासत्तेच्या धोरणाचा परिणाम म्हणुन जनता नेहमीच भोगत असते---
रामदेवबाबा-आण्णा हजारेंची आंदोलने ही कायदेशीर व्यवस्थेच्या विरोधी आहेत---
अनेक संघटना हे  भारतीय समाज वास्तव---
लोक हमेशा बरोबर असतीलच असे नाही---
बदलत्या परिस्थितीत महाराष्ट्रात जे प्रयोग होतील ते इतरत्र होतीलच असे नाही.
म्हणुनच व्यासपिठ हवेत---
परिस्थिती नाजुक आहे---
NAPM, समाजवादी पक्ष उभे रहातील---NGO कडील मंडळी कधीच पक्षात येणार नाही.
आपापसात गॅरंटी हवी---regional imbalance हा प्रश्न मोठा आहे---
आपण राजकीय trap आपण आहोत—२००-२५० कायकर्ते आहेत. त्यांना बांधावे---
आताचा नक्षलवाद हा State sponsored आहे---
हा मारक विचार आहे---
RPI हा केवळ व्यक्तीसापेक्ष मुद्यावर फुटतात---
जुनी व्यासपिठे परत उभी करावीत----
कार्यकर्ते NGO ग्रासीत आहेत---आता state ला भिडत नाहीत—म्हणुन पर्यायी राजकारण करण्याची गरज आहे---
यामार्गाने परिवर्तनाचे राजकारण होणार नाही---मोकळी चाकळी चर्चा झाली पाहिजे----
NGO आणि परिवर्तन एकत्र कसे येणार? म्हणुन चर्चा पाहिजे---
वर्ग शत्रु ला सोबत घेऊन कसे  Masses ला कसे उत्तर देणार?
एकाच म्यानात अनेक तलवारी घेता येणार नाहीत----
व्यवहार आणि विचार कसा पाळणार---
Constitutional आव्हान देऊन चालणार नाही---Indian State चे याला mandate होते----ते चालले आहे---तो support चालला आहे---

कॉ. भालचंद्र कान्गो
महाराष्ट्र राज्य केंद्रीत प्रक्रिया असावी---
बहुजन श्रमिक समिति-रिडालोस-पर्याय कसा?
समान-किमान कार्यक्रमाधारित पर्याय –
निवडणुक आधी प्रक्रिया करावी—विश्वासाधारित चळवळ उभारावी—फ्रंट उभी नाही झाली तर चालेल---
शहरात परवडणारी घरे कशी मिळणार? यावर स्वस्तात घरे भुमिका घ्यावी---चळवळ करावी---
असंघटीत कामगार सर्वांना जगण्यायोग्य पेन्शन हा कार्यक्रम घ्यावा—शेतक-याला २०००/ पेन्शन ---यावर चळवळ---
जगण्यासाठी पेन्शन ----
प्रादेशिक असमतोल---आपला संघर्ष – समुह यात येत नाही---
महाराष्ट्राचे बजेट करतांना मानवी विकास निर्देशांक विचारात घ्यावा----
PDS मधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकली धान्य खरेदी करावी----
कामगार संघटनांच्या व्यवसाय करांतुन रोहयो पैसा दिला---आता तो दुसरीकडे वळविला---
अशा मुद्यांवर common programme विकसित करावा----
CPI ने निर्णय घेतला अशा व्यासपिठाचा----संघर्ष करता येइल---

उल्का
जमीन सुधारणा कायदे व पाणी समन्यायी पध्दतीने वाटप---हे मुद्दे घ्यावेत---

एड. सुभाष गायकवाड
दुसरी फाळणी—गॅट कराराच्या वेळी---लुटीच्या षडयंत्राची सुरूवात----
८४ कोटी आर्थिक-सामाजिक दृष्ट्या वंचीत समाज : डॉ. अर्जुन सेनगुप्ता अहवाल
या समुहांच्या प्रश्नांवर सर्वत्र लढत आहेत---
आपला जनाधार कोणता?
असंघटीत क्षेत्रांतील मजुर कसा संघटीत करणार?
धार्मिक उद्योजकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादापासुन त्यांची सुटका कशी करणार?
निरंतर चालणारी ही प्रक्रिया---
जुना इतिहास परत सांगावा लागणार आहे---साहित्य निर्माण करून विद्यार्थ्यांना द्यायला हवा---महाविद्यालयात जावे—पब्लिक स्कुलमध्येही जायला हवे----
राजकारणात हस्तक्षेप ---आपण एकही उमेदवार उभा करत नाही—म्हणुन तसे होता कामा नये---डॉ. कानगो-सुभाश लोमटेंसारखी माणसे उभी राहिली पाहिजेत---
बिन चेह-याच्या ८४ कोटी समुहाला चेहरा देणे उद्देश---व मुख्य प्रवाहांत आणले पाहिजे----

डॉ. मंगल धारवाडकर
शाळांमध्ये प्रबोधनाचे काम चालु आहे---५ वर्षांपासुन---

कॉ. अभय टांकसाळे
आपासातले भुमिकातील वैचारिक मतभेद---लोकांना आपले कंगोरे माहितच नाहीत---ते मानतात आपण सारे एकच आहोत---
ही लोकांची गरज आहे.
मी विद्यार्थी विभागात काम करतो---ते corrieristic झाले आहेत---ते चळवळीत येत
नाहीत—पक्षांचे अनुयायीच सहभागी असतात –ज्यांचे प्रश्न ते सहभागी नाहीत---आण्णा
हजारेंच्या आंदोलनात तरूण-विद्यार्थी होते---लोक पर्यायी नेतृत्वाचा-चळवळीचा शोध घेत
आहेत---
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे---

दिपक कसाळे
“सम्यक संवाद” म्हणजे राजकीय संवाद आणि पर्याय—
आपासातले मुद्दे महत्वाचे ----
आपापसात संवाद नाही---कुणाशीही युती होते –हे कां घडले?
Dialogue Culture चा अभाव आहे---Listening होत नाही---
२००० च्या विचारवेध मध्ये डॉ. गोपाळ गुरु—प्रतिक्रियेच्या चौकटीतील आंदोलनांनी स्वबदलाकडे अधिक लक्ष दिले—व्यवस्था बदलाकडे जात नाही---
आधी राजकीय की सामाजिक अधिक विचार हवा----
परस्परांमध्ये विरोध टोकाचा दिसतो एकाच पक्षात दिसतो---व्यवस्था आणि व्यक्ती य दोन्ही आहेत—म्हणुन स्वबदलाची प्रक्रिया “Decaste-Declass-Degender” प्रक्रिया महत्वाची---
पर्यायी सत्ता समतोलाचा विचार हवा-
मतभेद कसा आणि कुठे?
मानवी व्यवहार कसा?

बुध्दप्रिय कबीर
डाव्यांची राजकीय उपद्रव मुल्यता कमी –ती वाढविण्याचा विचार हवा----महाराष्ट्रात हवा-
मतदानात convert करण्यात कमी पडतो---

कॉ. भिमराव बनसोड
मतभेद कायम ठेवुन एकत्र येण्याची परंपरा आहे औरंगाबादची ---

उल्का महाजन
विचारवेध चालविण्याची जबाबदारी घेऊन पुढे सर्वांनी गेले पाहिजे---पण आता राजकीय विचार हवा-

आता हात राखुन सर्वजण वागताहेत---कारणे?
कामगार संघटना सर्व मिळुन शिवाजी पार्क भरत नाही ही शोकांतीका आहे---
प्रत्येकाचे इतिहासाचे ओझे आहे---
NAPM आघाडी आणि
NGO म्हणजे  फॉरेन फंडिंग, शेतमजुर चळवळी या सर्वांना एकाच मापाने मोजु नये---मोठी चुक करु—
कात्री मारू नये—पुरोगामी चळवळीचा मोठा आधार आहे---
अनेकजण समाजवादी पक्षापासुन दुर गेले आणि उपक्रम-प्रयोग करीत आहेत –त्यांना कसे वाटायचे? विचार ही कसोटी असावी---राजकारण म्हणजे केवळ निवडणुक नाही—सत्ता संबंध महत्वाचे—म्हणुन एकवटण्याचे प्रयत्न हवेत---
प्रत्यक्ष व्यवहारात कसे वागायचे? लोक गोंधळात रहातात---
SEZ विरोधी लढाईला टोक येत नाही----

एड. विष्णु ढोबळे
NAPM मधील सर्वच तसे नाहीत---NGO मध्ये केवळ फॉरेन फंडिंग वर जगणारे –

कानगो
समाजाचे अराजकीयीकरण हा महत्चाचा मुद्दा---

संजीव चांदोरकर
स्वागतार्ह प्रयत्न---
विद्यर्थी असु नये---
सुचना:
१)   राजकीय एकजुत यावर एकमत
२)   संघटनात्मक एकतेसाठी लागणारी वैचारिक एकता हवी—
३)   ही प्रक्रिया काय असेल?
४)   एकत्र काम करण्यासाठी Broad Frame काय असावी?
५)   Concrete सुचना
६)   सहमतीचे आणि मतभेदाचे मुद्दे कोणते –Does & Do’nt
७)   How to operationalise the Idea?
८)   पुढील बैठका कुठे, कोण घेणार?

भालचंद्र कानगो
Issue base Unity लवकर होते---त्यात सर्व विचारसरणी एकत्र येतात---
वैचारिक चौकट ठरवुन युती करावी---Information-बदल -माहिती देणारी यंत्रणा नाही---
माहिती अचुक नसेल तर चळवळीवर परिणाम होतो---
कोरडवाहु शेती—कॉंन्ट्रक्ट लेबर आदि ---प्रश्नावर माहिती ---
“प्रश्न आणि चळवळी” यावर एकत्र यावे---त्याचे राजकियीकरण कसे करावे हा प्रश्न आहे---

संजीव चांदोरकर
कष्टकरी वर्गाची दखल घेणारी चळवळ हवी—

भालचंद्र कानगो
सोलापुरच्या अधिवेशनानंतर मोलकरणींच्या प्रश्नाला चालना मिळाली---राजकीयीकरण करायला हवे---
आर्थिक प्रश्न टोकदार असतात---व्यापक जनसमुहाला एकत्र आणुन प्रयत्न करावेत---
निवडणुक दरम्यानच्या आघाड्या ---संधिसाधुपणा येतो---पण नंतर किंवा खुप आधी एकजुट करावी----

कॉ. भिमराव बनसोड
बॅनर वेगळे त्याअर्थी एकत्र येणार नाहीत---issues वर एकत्र येतील ---आता रोहयोला आता महाराष्ट्रात स्थान नाही---रोहयोला पैसा कमी पडु देणार नाही---असे विलासरावांनी सांगितले—महाराष्ट्रांतुन ती बाद झालेली आहे---कामगार आंदोलन जोरात नाही---बचावात्मक आहे---यापुढे शेतक-यांचे लढे जोरात होणार आहेत ---जागतिकीकरण विरोधी व्यासपिठाच्या नावानेच करावे---तो अंदाज घेऊन काही तरी करावे---
निवडणुका आल्यावर काय ते ठरवावे---

उल्का महाजन
कॉंग्रेसने रोहयोचे महत्व ओळखले आहेत—नव्या MREGS कायद्याने तो पुढे येत आहे---
Food Security Bill, जमिन कायदे वा इतर प्रश्नांवर आमदार-खासदारांची बैठक बोलवावी—
संघटीत कामगार संघटनांकडे पैसा आहे---त्यांच्या मार्फत दोन कार्यकर्त्यांची व्यवस्था करावी—
शेतक-यांची आत्महत्त्या यावर काही पावले टाकावित

भालचंद्र कान्गो
शिक्षण आणि आरोग्य यावर विचार करावा--
निवडणुकीच्या-सत्तेच्या राजकारणात डाव्यांना स्थान नाही—म्हणुन महायुतीचे प्रयोग होतात---
दोन वर्षांपासुन प्रश्नांवर लढलो तर इतर पक्षांना त्याची दखल घेऊ शकतील—प्रभाव पाडु शकतील---
कोणत्याही पक्षांनी घरांचा प्रश्न मांडला नाही---विदर्भात खुरट्या जंगलाचा प्रश्न महत्वाचा--

भिमराव बनसोड
औरंगाबाद मॉडेल: औरंगाबादचे कार्यकर्ते बाहेरचे –कर्मभुमी—मतभेद कायम ठेऊन--एकत्र येतात—

शांताराम पंदेरे
Ideology, Critical Mass, Leader, Programme, Organisation

एड. विष्णु ढोबळे
अशी चर्चेची अपेक्षा नव्हती---व्यासपिठांना strengthen करावीत—(विनिशी, विद्रोही, विचारवेध) ही राजकिय व्यासपिठच आहेत---पुढील काळात यांची खुप गरज आहे---
आघाडीचा प्रयोग खुप जुना---आंबेडकरांपासुन---शाहु महाराजांपासुन---१९२० पासुनची युतीची परंपरा---
महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैशिष्ट्य -सामाजिक-आर्थिक-राजकीय-व्यवहार---मुद्दे खुप आहेत--
महाराष्ट्र प्रयोगशाळा आहे—
तेलंगणा संघर्ष २०० किमी आणि दादासाहेब गायकवाडांचे आंदोलन झाले---राजकीय आघाड्या परिस्थितीतुन झाल्या---महाराष्ट्रातील issues ठरवावेत—यात्रा केली—परिस्थिती वाचली पाहिजे---बेधडकपणे येथे प्रयोग करु शकतो—शेतीमध्ये crisis आहे—शेतक-यांची पोरे सत्तेत आहेत—
म्हणुन नवीन आघाडी करू नये—पुढा-यांची priority नाही—शेतकरी कोणता---८५% शेतकरी कोरडवाहु—त्याचे राजकारण करीत नाहीत---
भारतीय शासन संस्थेला activate करण्याचे काम केले पाहिजे---राज्य घटनेला उजवे-डावे यांनी विरोध केला- आंबेडकर-कॉंग्रेसने घटना लिहिली---

संघटीत कामगार चळवळीचे कायदे म्हणुन फायदे मिळाले—पण असंघटीत क्षेत्राचे काय?
Public sector बाबत खुप उशिरा बोललो—आंबेडकरांच्या मंत्रीपदापासुन हे कामगार कायदे आले—
नवीन banners करू नका—
जातनिहाय जनगणना –किती Constitutional आहे?
केंद्र शासनाच्या या योजनेचा अर्थ काय? डावे राजकारण सामाजिक वास्तवाला हात घालत
नाहीत—आपल्या कक्षा रुंदावल्या—
आताच्या प्रश्नावर शेतकरी आत्महत्त्या केल्यानंतर संघर्ष केला पाहिजे---
जंगलामधील आदिवासींमध्ये असंतोष आहे—भारत सरकारच जंगल बेचिराख करीत आहे.
त्यांचे कुणी ऐकत नाहीत—मग कुणाला address करायचे?

उल्का महाजन
आडात खुप आहे पण पोहरा अधुरा आहे---अंतर्गत फाटलेपण आहे ते दुर करण्यासाठी काय करावे—
विचारवेध कारांना सुचवावे—मागील “डावे राजकारणातील टप्पे आणि पुढील दिशा” यावर चर्चा घडवायला सांगावे. प्रत्यक्ष कार्यक्रमावर एकत्र यावे---डाव्यांशी वेगळा dialogue करावा—विविध व्यासपिठांवर चर्चा घडवाव्यात---

सुरेश सावंत
कांगोंच्या मुद्यांशी सहमत---आहेत त्या platform वर ते मुद्दे घ्यावेत---
Issue वरची एकजुट पुढे होईल---त्यात आपला कस लागेल---पुढारपणाचे cadre त्यातुन पुढे येईल---
“विकास प्रश्नांवर” मांडणी करावी लागेल---
पंदेरेंचा अभ्यासवर्गाचा प्रस्ताव महत्वाचा—नामदेव ढसाळांची कविता भावली होती—पण
आताच्या पिढीला हे पोचवायचे कसे?
नवीन पिढीला ओळख नाही—म्हणुन अभ्यासवर्ग घेतले--- तेच उपक्रम घ्यावेत---
“विद्रोही” सारखे platform वर चर्चा करायला हवी---
ताबडतोबीने राजकीय शक्ती उभी करण्याचा संकल्प—उर्मि कशी आणायची---
कामगार कृती संघटना कार्यक्रम १मेला पुर्व संधीला घेतला जातो. असंघटीत कामगारच येतो—बाकी येत नाही---भाई मात्र १मेला घेतो—
रोहयो, जंगल जमीन यातुन नवी समज आणुन पुढे जायला हवे.
चर्चा-संवाद सुरू व्हायला पाहिजे---low profile ठेवुन प्रक्रिया करायला हवी—
प्रश्न articulation करुन पुढे जायला अडचण---NGO बाबत पंदेरेंची भुमिका महत्वाची---

उल्का महाजन
बैठकीला बोलावित नाहीत--- फक्त प्रश्न मांडले जातात---खुलेपण हवे---

दिपक कसाळे
घाई झाल्यासारखे वाटते---coalition ते Issuebase –
चर्चा करण्याची गरज आहे---democratic process मध्ये सामाजिक प्रश्नांना डावलले जाते.
शेतकरी प्रश्न महत्वाचे—अभिनिवेश रहाणार म्हणुन आम्हाला डावलु नयेत---

माणगाव व औरंगाबाद येथील चर्चांमधील ठळक मुद्दे


·         बदलत्‍या वातावरणात मुद्द्यांवरची लढाई आपण समग्र करु शकलो नाही. आज बाहेर लोकांसमोर विश्‍वासार्ह नेतृत्‍व नाही. पुरोगामी परंपरेतील कार्यकर्ते त्‍यांना विश्‍वासार्ह वाटतात. पण त्‍या मुद्द्यापुरताच त्‍यांचा संबंध राहतो. अन्य प्रश्‍नांसाठी लोक आजच्‍या प्रचलित राजकीय कार्यकर्त्‍यांकडे जातात. त्‍या अनेकविध प्रश्‍नांच्‍या, अडचणींच्‍या सोडवणुकीसाठी आपण लोकांना उपलब्‍ध नसतो. चळवळींत कप्‍पेबंदपणा आला आहे. त्‍यांत विखंडितपणा वाढतो आहे. एकसंधता दिसत नाही.
·         चळवळी थंडावलेल्‍या नाहीत. तथापि, त्‍या गुड गव्‍हर्नन्‍स मागतात. सत्‍ता बदलण्‍याची-ताब्‍यात घेण्‍याची दिशा घेत नाहीत. त्‍यांचे अ-राजकीयीकरण झाले आहे. ‘राजकारणाला’ मध्‍यवर्ती आणणे, हे आपले काम असले पाहिजे.
·         ‘कोणतीही विचारसरणी नको’ असे म्‍हणणे, ही भांडवली विचारसरणीच आहे. चळवळींना दिशाहिन करण्‍याचा तो डाव आहे.
·         देशाच्‍या विकासाचे मॉडेल काय असणार, यावर सहमती झाल्‍याशिवाय चळवळींची व्‍यापक एकजूट कठीण आहे. अधिकाधिक सहमतीच्‍या दिशेने जाण्‍यासाठी ‘विचारवेध’ संमेलने मदतनीस ठरु शकतात. त्‍यांचे पुनरुज्‍जीवन करावयास हवे.
·         वैचारिक एकवाक्‍यता तातडीने होणे कठीण असते. त्‍याबाबतची चर्चा चालू ठेवायला हवी. मात्र मुद्देनिहाय एकजुटी वाढवत न्‍ययायला हव्‍यात.    
·         निवडणुका तोंडावर असताना होणा-या पुरोगामी पक्षांच्‍या एकजुटीचा कार्यक्रम व जाहीरनामा ख-या अर्थाने सहमतीचा व सर्वांना स्‍वीकारार्ह असतोच असे नाही. म्‍हणूनच निवडणुकांचा तातडीने संदर्भ नसताना सहमतीच्‍या व्‍यापक कार्यक्रमावर एकजूट व आंदोलन व्‍हायला हवे.
·         एनजीओंमुळे पुरोगामी राजकारण कमजोर झाले अथवा त्‍यांनी चळवळींना गिळंकृत केले, असे नसून पुरोगामी चळवळींच्‍या अ-राजकारणामुळे एनजीओ फोफावल्‍या.
·         पक्षीय चौकटीतून बाहेर पडणा-या सर्वांनाच ‘एनजीओ’चा शिक्‍का मारणे बरोबर नाही. ‘सत्‍तासंबंधांना धक्‍का लावणे म्हणजे राजकारण’ असेल, तर पक्षीय चौकटीत नसलेल्‍या अनेक व्‍यक्‍ती जनसंघटनांच्‍या पातळीवर हे राजकारण करत आहेत.
·         जनसंघटनेच्‍या पातळीवरील असा सत्‍तासंबंधांना धक्‍का लावणारा लढा झाल्‍यानंतर या लढ्याला पुढचे टोक कसे आणायचे, प्रत्‍यक्ष निवडणुकांत काय भूमिका घ्‍यायची हा प्रश्‍न असतो.
·         राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेण्‍यासाठी प्रभावी राजकीय व्‍यासपीठ उभे करणे आवश्‍यक आहे. (ताकाला जाऊन भांडे लपवू नये) केवळ प्रश्‍नांवर काम करणे प्रतिक्रियात्‍मक होते.   
·         परिवर्तनाचा वाहक कोण ? – संघटित कामगार, असंघटित कामगार की शेतीशी जोडलेले समुदाय ?
·         मध्‍यपूर्वेतील घडामोडी किंवा लॅटिन अमेरिकेतील बदल लक्षात घेतले तर आज जनकेंद्री डावे आंदोलन उभे राहण्‍याचा काळ आहे का, याचा विचार करावा करायला हवा. लाटा आदळणार आहेत. लोक पक्षाची वाट बघणार नाहीत. अशावेळी आंदोलन व पक्ष यांचा विचार एकत्रच करणे आवश्‍यक आहे का ? ....या प्रश्‍नावरील चर्चेत याप्रकारेही मत व्‍यक्‍त झालेः अभिजात अर्थाने कम्‍युनिस्‍ट पक्ष हे वैचारिक केंद्र असते, तो सत्‍ता हातात घेत नसतो, पक्षाकडून मिळालेल्‍या मार्गदर्शनाप्रमाणे जनआंदोलनात अन्‍य पुरोगामी शक्‍तींशी लोकशाही निर्णयप्रक्रियेने पक्षकार्यकर्ता सहकार्य करतो. त्‍यामुळे जनआंदोलन व पक्ष यांत द्वैत उभे राहण्‍याचा प्रश्‍नच येत नाही.
·         औद्योगिक भांडवलशाहीचा अंत होऊन आता वित्‍तीय भांडवलशाहीचा काळ सुरु झाला आहे. आजच्‍या प्रश्‍नांना एकास एक असे उत्तर नाही. गुंतागुंत वाढली आहे. प्रचलित पुरोगामी विचारसरणींचा विकास आवश्‍यक आहे.
·         आज संगणक क्रांती सर्वव्‍यापी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज या क्षेत्रात पुढे येतो आहे. संगणकाला एकेकाळी झालेला विरोध अनाठायी होता. भांडवलशाहीतूनच पुढची अवस्‍था येणार आहे. अशावेळी भांडवलशाहीने जन्‍माला घातलेल्‍या तंत्रसाधनांचा वापर नाकारणे अयोग्‍य आहे. ....या मतांच्‍या बरोबर विरोधी मतही व्‍यक्‍त झाले. संगणकाला विरोध हा त्‍यामुळे येणा-या बेकारीला विरोध होता. तो बरोबरच होता. आज ओबीसी समाज या क्षेत्रात दिसत असला तरी सूत्रे कोणाच्‍या हातात आहेत, हे पाहणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञान व जागतिकीकरण या दोन वेगळ्या गोष्‍टी आहेत. तंत्रज्ञानाला पाठिंबा असणारे जागतिकीकरणाच्‍या विरोधात असू शकतात. तंत्रज्ञानात झालेल्‍या प्रगतीने लोकांचे जीवनमान उंचावते, असे नव्‍हे.  
·         जुन्‍या काळात चळवळींना मिळणारा प्रतिसाद आणि आताचा क्षीण प्रतिसाद या स्थितीस आपली वैचारिक धारणा कारण आहे. वर्गाला जसे आपण महत्‍व दिले, तसे जातीप्रश्‍नाला दिले नाही. डाव्‍या नेतृत्‍वाच्या तात्त्विक, व्‍यावहारिक मर्यादा आजच्‍या स्थितीस कारण आहेत. कोणत्‍याही एकजुटीसाठी वैचारिक एकजूट सर्वाधिक महत्‍वाची असते.
·         आपल्‍या एकजुटीच्‍या आड फक्‍त वैचारिक मतभेदांपेक्षाही इतर अनेक बाबी कारण आहेत. एकाच प्रश्‍नावर काम करणा-या संघटनांची जूट न होण्‍यात नेतृत्‍वाचे वैयक्तिक अहंगंड आड येतात. वैचारिकतेपेक्षाही खरे म्‍हणजे या अन्‍य बाबीच अधिक परिणाम घडवतात.
·         काहीवेळा तात्‍पुरत्‍या लाभासाठीची सबगोलंकारी एकजूट ही भविष्‍याच्‍या दृष्‍टीने मारक ठरते. ‘रिडालोस’वर अनेकांनी यासंदर्भात मते व्‍यक्‍त केली. ती फसवी एकजूट होती, ही सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.
·         लोकांकडे सत्‍ता जाणे, लोक सिद्ध होणे-प्रसंगी संघटना क्षीण झाली तरी चालेल-यास महत्‍व द्यायला हवे. याचा अर्थ, राज्‍य किंवा केंद्र या सत्‍तांना कमी लेखणे नव्‍हे. ‘मेंढालेखा’ने पुढे आणलेली ‘दिल्‍ली-मुंबईत आमचं सरकार, आमच्‍या गावात आम्‍हीच सरकार’ ही घोषणा पूर्णत्‍वाने लक्षात घेणे आवश्‍यक आहे.
·         विकासप्रक्रियेचा लाभ दलित, मुस्लिमांना होतो, पण गावातील निर्णयप्रक्रियेत त्‍यांचा सहभाग नसतो. त्‍यांची सिद्धता कशी करायची ?
·         जातीलाच जातीचे दुखणे कळते, ते इतरांना कळू शकत नाही, हा विचार योग्‍य आहे का ?
·         बचत गट तसेच ग्रामपंचायतीतील महिलांच्‍या प्रवेशाने जे नवे चैतन्‍य महिलांच्‍यात मोठ्या प्रमाणात दिसते आहे, त्‍याची योग्‍यप्रकारे नोंद आपल्‍याकडून घेतली जाते, असे वाटत नाही.
·         वैचारिक मतभेद तीव्रतेने मांडले जाण्‍यात गैर काही नाही. पण जराही वेगळे बोलणारा आमच्‍यातला नव्‍हे, अशी भूमिका घेतली जाते, हे बरोबर नाही. व्‍यापक आघाडीत वैचारिकतेचे टोक किती गाठायचे याला मर्यादा असावी लागते. भांडवलदार कितीही आपसात भांडले तरी परस्‍परांच्‍या धंद्याला खोट बसू देत नाहीत. त्‍यांचे हितसंबंध आपल्‍यापेक्षा कितीतरी जास्‍त असतात. तरीही ते हा समज दाखवतात. आपण तर ‘ओसाड’ गावचे राजे. आपण हा समज दाखवत नाही. ‘वैचारिक पाया’ ची चर्चा तासन् तास चालते. पण एकत्र कसे राहायचे, याची चर्चा, त्‍याचे यमनियम आपण ठरवत नाही. भांडवलदार लांब पल्‍ल्‍याची आखणी करतात. आपल्‍यालाही जे करायचे आहे, ते पुढच्‍या पिढीसाठी, हे आपण लक्षात घ्यायला हवे. 
·         आपण निवडणुका लढायला घाबरतो. घाण साफ करायची तर नाल्‍यात उतरावे लागते. नाल्‍यात उतरले की थोडी घाण आपल्‍या अंगावरही उडणार. त्‍यास आपण घाबरता कामा नये.
·         राज्‍यसंस्‍थेचे स्‍वरुप बदलते आहे. ९० नंतरच्‍या उत्‍तर औद्योगिक काळात संस्‍थीभवनाचे पॅटर्न बदलले आहेत. औद्योगिक भांडवलशाहीने राष्‍ट्रराज्‍य संकल्‍पना व गतिमानता दिली. आता सिटिझन ऐवजी नेटिझन व्‍हायला लागलो आहोत. तंत्रज्ञान नाकारणे हे अनैतिहासिक आहे. तथापि, वाढत्‍या कनेक्टिव्हिटीत मानवी प्राण कसे ओतणार हा प्रश्‍न असल्‍याचे ते म्‍हणाले. कामगार व किसान हे चळवळीचे आधार या पूर्वीच्‍या अर्थाने आता कालबाह्य झाले आहेत. नव्‍या मध्‍यमवर्गातले काही जण निराभास होत आहेत, हे लक्षात घेऊन त्‍यांच्‍याशीही संबंध जोडले पाहिजेत. नवी चिकित्‍सा उभी करणारे त्‍या त्‍या जातीत, समाजविभागांत उभे राहायला हवेत. तसे काही उभे राहतही आहेत. त्‍यांना आपण बाहेरुन साथ द्यायला हवी. ते एकटे पडता कामा नयेत. ...या मांडणीवर चर्चा करताना वित्‍त भांडवलाचं अस्तित्‍व औद्योगिक भांडवलावर असते, अशी थोडी सैद्धांतिक चिकित्‍साही झाली.
·         काही जुन्‍या समजुतींना नव्‍या संशोधनाने नकार दिलेला आहे, हे आपण लक्षात घ्‍यायला हवे. आर्य बाहेरुन आले, प्राचीन काळी आदिम समाज हा स्‍त्रीसत्‍ताक होता, या समजुतींचा फेरविचार करायला हवा. एकलव्‍याचा अंगठा मागणा-या द्रोणाचार्यांचा हेतू गैरच होता. तथापि, जगात कोणीही आदिवासी बाण सोडताना अंगठ्याचा वापरच करत नाहीत, अगदी ऑलिंपिकमध्‍येसुद्धा याची आपण नोंद घ्‍यायला हवी. आदिवासींचा धर्म हिंदू नाही, किंबहुना त्‍यांना धर्मच नाही, हे म्‍हणत राहिल्‍याने ते भाजपच्‍या दावणीकडे कसे सरकले याचा विचार करायला हवा.
·         पुढील उपाययोजनांसंबंधी तसेच आकृतिबंधाबाबत आलेल्‍या काही सूचना अशा आहेतः
o    नव्‍या कार्यकर्त्‍यांची तयारी करणारी शिबिरे.
o    आपापल्‍या कार्यक्षेत्रात, स्‍थानिक ठिकाणी अभ्‍यासमंडळे, व्‍याख्‍यानमाला, राज्‍यव्‍यापी/विभागवार परिवर्तनवादी विचारांचे सांस्‍कृतिक जलसे/साहित्‍य चर्चा यांचे आयोजन.
o    पुढच्‍या चर्चांमधून विविध समाजघटकांचे मानस तसेच राजकीयीकरण म्‍हणजे काय अशा मुद्द्यांची चर्चा व्‍हावी, कार्यकर्ता व अभ्यासक यांचा समावेश असलेले ‘विचारवेध संमेलन’ (जे सध्‍या थांबवण्‍यात आले आहे) नव्‍या स्‍वरुपात सुरु करावे.
o    ‘सांस्‍कृतिक क्षेत्रातील हस्‍तक्षेप’ याबाबचा आराखडा तयार करावा.
o    विविध विचारसरणींचा परिचय करुन देणारी शिबिरे.
o    महत्‍वाच्‍या विषयांवरचे लेख झेरॉक्‍स करुन आपल्‍यात वितरित करणे.
o    संपर्क-संवादाचे एक माध्‍यम म्‍हणून एक ब्‍लॉग तयार करावा तसेच आपल्‍या चळवळीचे साहित्‍य इंटरनेटवर सहजरित्‍या उपलब्ध होण्‍यासाठी युनिकोडचा वापर वाढवावा.

Friday, 15 July 2011

‘लोकपाल’च्‍या संबंधात


‘लोकपाल’च्‍या संदर्भातील आंदोलने व  प्रसारमाध्‍यमांतून सुरु असलेला गदारोळ या पार्श्‍वभूमीवर विविध चळवळीतील सामान्‍य कार्यकर्त्‍यांची एक बैठक 30 जून 2011 रोजी कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीतील मांडणी व चर्चेच्‍या आधारावर खालील टिपण तयार केलेले आहे.
गेले ४-५ महिने, प्रामुख्याने माध्यमांद्वारे लोकपाल विधेयक संदर्भातील चर्चा जोरदारपणे सुरू आहे. अण्णा हजारेंचे उपोषण, केन्द्र सरकार व अण्णांच्या सहका-यांबरोबर तयार झालेली कमिटी, मध्येच रामदेवबाबांनी घेतलेली उडी आणि आता जुलैच्या संसदीय अधिवेशनात केन्द्र सरकारतर्फे मांडले जाणारे विधेयक...या सगळ्याबाबतीत चर्चा उदंड सुरु आहे. परस्पर आरोप-प्रत्‍यारोप होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नेमके हे विधेयक काय आहे, हे मंजूर झाल्यास यातून भ्रष्ट्राचार संपविण्याची कोणती यंत्रणा तयार होणार आहे, यासाठीच्‍या आंदोलनाची हाताळणी व देशाची मूलभूत लोकशाही चौकट याबाबत सामान्‍य कार्यकर्त्यांना किमान स्पष्टता यावी या मर्यादित हेतूने व थोडक्यात, प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती देत आहोत.
प्र. १लाः  लोकपाल विधेयक  म्हणजे नेमके काय आहे? याची सुरूवात कधी झाली ?
उत्तरः- लोकपाल ही नवीन संकल्पना नाही. जगातील काही देशांमध्ये ही यंत्रणा आहे. सरकारच्या  कारभारावर देखरेख करणा-या अनेक यंत्रणांपैकी ही एक असते.
     स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्‍या देशाची घडी बसविताना अनेक आयोग नेमले होते. पूर्वी ब्रिटिशांचे राज्य  होते. त्‍यांनी केलेल्‍या रचनांमध्‍ये काय बदल करायचे याचा अभ्यास करून हे आयोग सूचना देत होते. १९६६ साली प्रशासकीय सुधार आयोगाने (Administrative Reform  Commision) केलेल्या अनेक सूचनांपैकी लोकपाल नेमण्याची एक सूचना करण्यात आली होती. केन्द्रात लोकपाल व राज्यपातळीवर लोकायुक्त नेमावे अशी सूचना होती. १९६८ साली लोकसभेत लोकपाल विधेयक  मांडले गेले व ते मंजूर झाले. मात्र राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही. लोकसभा पुढे बरखास्त झाली आणि विधेयकही बारगळले. पुढे  1971,  1977, 1985 , 1989, 1996 , 1998 , 2001 , 2005 , 2008   इतक्या वेळा हे विधेयक  संसदेत मांडण्यात आले. मात्र पुढे त्याचा अभ्यास करणारी कमिटी करुन तिच्‍याकडे ते सुपूर्द करुन बासनात बांधले गेले.
इथे एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की या ४०-४२ वर्षात हे विधेयक संसदेत मांडले जात असताना सरकार कुणा-कुणाचे होते ? तर कॉंग्रेस, जनता पक्ष, डाव्या–उजव्यांच्या पाठिंब्याने व्ही.पी.सिंग, तिसरी आघाडीचे देवेगौडा, गुजराल, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी व कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी. म्हणजे प्रत्येक पक्षाचे सरकार असताना हे विधेयक संसदेत मांडले गेले. पुढे मात्र काहीच झाले नाही.
मात्र प्रशासकीय सुधार आयोगाच्या दुस-या शिफारसीनुसार राज्य स्तरावर लोकायुक्त  नियुक्त केले गेले. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे  जिथे ऑक्टोबर १९७२ मध्ये लोकायुक्त नेमण्यात आला. यानंतर आंध्र प्रदेश (१९८३), गुजरात (१९८६), आसाम (१९८६), पंजाब (१९९७), राजस्थान (१९७३), उत्तर प्रदेश (१९७५), बिहार (१९७३), कर्नाटक (१९८६), केरळ (१९९९), मध्‍यप्रदेश (१९८१), ओरिसा (१९९५), हिमाचल प्रदेश (१९८३), हरियाणा (२००२), दिल्ली (१९९५), इत्यादि.
लोकायुक्त ह्या पदासाठी उच्च न्यायालयाच्‍या निवृत्त न्यायाधीशांमधून निवड केली जाते. हे लोकायुक्‍त नागरिकांबरोबरच प्रशासनाकडून गैरव्यवहार झाल्यास, त्या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल देतात. लोकप्रतिनिधींबाबतही ते चौकशी करू शकतात. मात्र शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही. चौकशी करून संबंधित अन्य सरकारी यंत्रणेकडे पुढील कारवाईसाठी हा अहवाल जातो. उदा. सध्या कर्नाटकात तिथले जे मंत्री बेकायदेशीर खाण उद्योग करीत आहेत, त्यांच्‍याबाबत तिथले लोकायुक्त श्री. संतोष हेगडे चौकशी करत आहेत. हे प्रकरण खूप चिघळले आहे. (संतोष हेगडे सध्‍या अण्णा हजारेंचे सहकारीही आहेत.)
प्र. २ राः कोणताही कायदा कसा बनविला जातो ?
उत्तरः- कायदे बनविण्याचा अधिकार संविधानाच्या निर्देशांप्रमाणे केन्द्र व राज्य सरकारांना असतो. इथे आपण केन्द्र सरकारच्या कक्षेत येणा-या कायद्यांबाबत माहिती घेऊ या. केन्द्रात ज्या पक्षाचे सरकार असते ते सरकार कायद्याचा मसुदा तयार करते. त्या मसुद्याबाबत सरकार लोकांकडून मते मागविते. उदा. वर्तमानपत्रात जाहीराती देऊन किंवा इंटरनेटवरून लोकांना उपलब्ध करून देते. ज्या विषयाशी संबंधित कायदा करायचा असेल त्या क्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञ लोकांशी सरकार विचार विनिमय करते. या प्रक्रियेनंतर कायद्याचा मसुदा मंत्रीमंडळासमोर ठेवला जातो. मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर चर्चेसाठी लोकसभेत व राज्यसभेत मांडला जातो. दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनी सही केल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होते. त्यामुळे कायदा कसा असावा यासाठी आंदोलने, चर्चा, प्रचार सभा, उपोषणे सगळे करण्याची मुभा आपल्याला संविधानाने दिली आहे. मात्र कायदा संसदेत किंवा विधिमंडळातच बनविला जातो.
प्र. ३राः  भ्रष्‍टाचाराला लोकपाल बिल मंजूर झाल्यास आळा बसेल का ?
उत्तरः- या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपल्यासमोर भ्रष्ट्राचार म्हणजे नेमके काय-काय आहे हे बघू या. एक म्हणजे चिरीमिरी  देणे, लाईट-पाणी कनेक्शन, गटार साफ करवून घेणे, फाईल पुढे सरकाविणे, सर्टिफीकेट मिळवणे इत्यादी साठी नाईलाजाने द्यावे लागणारे पैसे. दुसरा सरकारी अधिकारी, उच्चपदस्थ व आमदार-मंत्री यांनी त्यांच्या पदाचा, अधिकारांचा गैरवापर करून स्वतः मिळवलेला फायदा, उदा. आदर्श सोसायटीत फ्लॅट मिळावा म्हणून संगनमताने केलेले कायद्यातील बदल, भूखंडाचे आरक्षण बदलून घेणे, कंत्राट देताना पारदर्शीपणे प्रक्रिया पार न पाडता व्यवहार करणे. तिसरा म्हणजे सिस्टमिक किंवा व्‍यवस्‍थात्‍मक भ्रष्ट्राचार. म्हणजे कायदाच असा बनवायचा की त्याचा फायदा मूठभरांनाच होईल. उदा. शाळेची फी शाळा व्यवस्थापन  कितीही ठरवू शकते, या कायद्याने शाळांना भ्रष्ट व्यवहार करायची कायदेशीर मोकळीच मिळते. आणखी एक उदाहरण बघू या. एखादा बस मार्ग (रुट) खूप नफा देणारा असतो. तिथे  खाजगी बस गाडयांना सरकार पूर्ण मुभा देते. मग बरेचदा सरकारी सेवा तोट्यात जाते. मात्र एखाद्या आडमार्गावरील छोट्या खेड्यात तोटा सहन करून सरकारी बसच जाते. तिथे खाजगी बसवाले जायला तयार नसतात.
       म्हणून भ्रष्ट्राचाराची व्याख्या करायची झाल्यास कुणाच्या तरी कष्टातून तयार झालेल्या संपत्तीतील मोठा वाटा कष्ट न  करणा-या विभागाने घेणे  किंवा सरकारी पायाभूत सेवा-सुविधांतून उभे केलेल्या यंत्रणेचा फायदा खाजगी विभागांना नफा वाढविण्यासाढी देत राहणे असे ढोबळमानाने म्हणता येईल.        
       आता लोकपाल बिल हे कुठल्या प्रकारच्या भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी आहे, ह्या मुद्याकडे वळू या. उच्चपदस्थ अधिकारी, खासदार, मंत्री ह्यांनी त्यांच्या पदाचा, अधिकाराचा गैरवापर करून केलेल्या व्यवहाराची तक्रार लोकपाल या यंत्रणेकडे करता येईल. लोकपालाला या बाबत काय-काय अधिकार असावे, पंतप्रधान तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची चौकशी करण्‍याचा अधिकारही लोकपालाला असावा का, इत्यादी बाबत सध्या चर्चा सुरू आहे.
प्रश्न ४ थाः  सरकारी अधिकारी आणि खासदार–मंत्री यांच्या गैरव्यवहार, भ्रष्टाचार याबाबत सध्या कुठला कायदा आहे का?
उत्तरः- भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अनेक कायदे आजही अस्तित्वात आहेत. लाच-लुचपत प्रतिबंधक कायदा आहे. प्रशासकीय कर्मचा-यांबाबत कायदा आहे. सी.बी.आय. (केन्द्रीय जाँच आयोग) आर्थिक घोटाळ्याबाबत गुन्‍हा दाखल करू शकते. (सध्या पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी, तामिळनाडूचे खासदार व केंद्रीय मंत्री ए. राजा व कानीमोझी व त्यांच्या खात्याशी संबंधित बरेच अधिकारी तुरूंगात आहेत. त्यांना २-३ महिने कोर्टाने जामीनही मंजूर केलेला नाही.)
केन्द्र व राज्य सरकारचे हिशेब तपासून बघणारी कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल  म्हणजे कॅग ही यंत्रणा आहे. सरकारने जर योग्य निर्णय घेतले नसतील, त्यातून संबंधीत खात्याला तोटा झाला असेल किंवा एखाद्या खाजगी कंपनीचा नफा करून दिला असल्यास कॅग त्याबाबत प्रश्न उपस्थित करते. याशिवाय  उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही प्रशासन, अधिकारी, सरकारी निर्णय याबाबत तक्रार करून दाद मागता येते.
मग लोकपाल बिलातून नेमके काय वेगळे घडणार आहे ? या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी सध्या अण्णा, बाबा रामदेव व लोकपाल निमित्ताने बरेच नवीन शब्द, संकल्पना मांडल्या जात आहेत, त्याबद्दल थोडे सांगायला हवे.
प्रश्न ५ वाः सिवील सोसायटी चे आम्ही प्रतिनिधी आहोत असे अण्णांच्या सहका-यांकडून सांगितले जाते, याचा अर्थ  काय ?
उत्तरः- आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून सरकारने आमचे म्हणणे ऐकले पाहिजे असे सिविल सोसायटी म्हणविणा-यांचा आग्रह आहे. इथपर्यंत काहीच हरकत नाही. समाजिक काम करणारे संघटनेचे लोक विविध प्रश्नांबाबत सरकारला आपले मत सांगू शकतात व सरकारही त्यांचा सल्ला घेऊ शकते, घेते.
प्रश्न तयार होतो, जेव्हा फक्त आम्हीच लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि सरकारने आमचेच म्हणणे ऐकले पाहिजे,  असा दुराग्रह सुरु झाल्‍यावर.  ५ एप्रिल २०११ ला अण्णा हजारेंचे दिल्ली येथे उपोषण सुरू झाले. त्यापूर्वी ३० जानेवारी २०११ ला दिल्लीला राजघाट येथे किरण बेदी, अरविंद केजरीवाल इत्यादीनी भ्रष्टाचार विरोधात शेकडो लोकांसोबत शपथ घेतली होती. लोकशाहीत आपल्याला हा अधिकार आहेच.
मात्र आम्ही म्हणू तोच मसुदा तयार व्हायला पाहिजे, आम्ही म्हणू त्याच व्यक्ती कमिटीवर नेमा, कमिटीत अमुक पद आमच्याकडे पाहिजे, असे सुरु झाल्‍यावर लोकशाही संपू लागते, समाजाचे प्रतिनिधी म्हणजे फक्त आम्हीच असा पवित्रा घेतला जातो.
या सिवील सोसायटीत अण्णाबरोबर कोण कोण आहेत ? तर प्रसिद्ध नट-नट्या, उद्योगपती, ठिकठिकाणचे विरोधी पक्षाचे नेते. या सगळ्यांच्या व्यवहाराबाबतही प्रश्न उपस्थित होतोच. जसे खासदार, मंत्री अधिकारी भ्रष्टाचारी असतात तसेच अण्‍णांना पाठिंबा देणा-यांतही भ्रष्‍टाचा-यांचा  भरणा दिसतो.
इथे एक गोष्ट आपल्या मनात स्पष्ट हवी. निवडून दिलेले खासदार-आमदार हे सुद्धा लोकप्रतिनिधीच आहेत. जेव्हा संघटनेत काम करणारे किंवा स्वतःला सिवील सोसायटी सभासद म्हणविणारे या भूमिकेतून बोलतात की, आम्ही लोकांचे प्रतिनिधीत्व करतो, आमच्या  मागे लोक आहेत, तेव्हा त्यांना ह्याचा विसर पडतो की आमदार–खासदाराच्या मागेही लोक असतात. काही हजार, लाख लोक त्यांना मत देतात, म्हणून ते निवडून येतात. लोकांच्या वतीने संसदेत बोलण्याचा, कायदा करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे. भारतीय संविधानाने ही प्रातिनिधिक लोकशाही यंत्रणा तयार केली आहे. म्हणून व्यक्ती कितीही थोर असली तरी मी म्हणेन ते कलम मसुद्यात घ्या नाहीतरी उपोषण सुरू ही भूमिका पूर्ण लोकशाही विरोधी आहे. त्यामुळे ‘जनलोकपाल’ याला काहीच अर्थ नाही.
प्रश्न ६वाः आणि रामदेव बाबांचे काय?
उत्तरः- वरील प्रश्नाबाबत जे मांडले, तोच मुद्दा आहे. भारतात लाखो लोकांना योग शिकविणारे म्हणून रामदेवबाबांबाबत कुणालाही आदर असावा. पण म्हणून जर त्यांनी मागण्यांची यादी देऊन उपोषणाची धमकी दिली तर त्यातून प्रश्न तयार होतात. त्यांच्या प्रश्नांच्‍या यादीमध्ये एक मुद्दा होता, शिक्षणाचा. त्यात म्हटले होते की, ब्रिटीशांच्या शिक्षण पद्धतीचा प्रभाव संपवून स्वीडन देशातील शिक्षण पद्धती इथे लागू करा. इथे लक्षात घ्यायला हवे की, सरकारने जर अशा मागण्या मान्य करायला सुरूवात केली तर लोकशाही रसातळालाच जाईल. त्यामुळे हम कहे सो कायदा  या वृत्तीला खतपणी मिळेल. म्हणून ह्या प्रकारांना आळा घातलाच गेला पाहिजे. नाहीतर प्रत्येकाचे ‘जन लोकपाल’ अशी अनेक जनलोकपाल बिले तयार होतील.
प्रश्न ७वाः लोकपाल विधेयकाबद्दलचे आंदोलन हा ‘दुसरा स्वातंत्र लढा आहे’ असे अण्णांचे सहकारी म्हणतात, याचा अर्थ काय ?
उत्तरः- हे म्हणणे भंपकपणाचे आहे. देशाचा एकच स्वातंत्र्य लढा होता. तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधातील. त्या स्वातंत्र्यलढ्यातील आश्वासने पूर्ण व्हावीत म्हणून सध्या आंदोलने करणे योग्य आहे. एक म्हणजे ब्रिटीशांना आपण निवडून आपले, प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठविले नव्हते, त्यांना इथून हाकलून देण्याचा प्रश्न होता. सध्‍याचे सरकार आपण म्हणजे भारतीय जनतेने निवडून दिलेले आहे. ते नको असल्यास आपण मतदानाने दुसरे आणू शकतो. असे भारतातील लोकांनी अनेकदा केले आहे. म्हणूनच निवडून येईपर्यंत कितीही पैसे वाटले, दमदाटी केली तरीही त्या व्यक्तीली जिंकण्याची खात्री नसते.
    दुसरा मुद्दा, समजा अण्णा व त्यांच्या सहका-यांना किंवा रामदेवबाबांना सरकार उलथून टाकायचे व स्वातंत्र्य लढा सुरु करायचा असेल तर सरकारने यांच्‍याशी लोकशाही चर्चा का करावी?   मग नक्षलवाद्यांसारखे सरकारविरूद्ध युद्ध पुकारले पाहिजे. सरकार बरोबर कमिटीत बसता कामा नये. याबद्दलची भूमिका स्पष्ट असायला हवी, नाही तर सगळा राजकीय माहोल अराजकाकडे म्हणजे गोंधळाकडे नेण्याचा हा प्रयत्न होतो.
प्रश्न ८वाः मागचा प्रश्न- लोकपाल विधेयकातून काय  घडणार आहे? आणि याला आत्ताच इतके महत्व का प्राप्त झाले ?
उत्तरः-  ४-५ वर्षापूर्वी महिती अधिकार नागरिकाना मिळाला. त्यामुळे अनेक गैरव्यवहारांच्या बाबतीत कागदोपत्री माहिती संबंधित सरकारी खात्यांकडून मिळू लागली. घोटाळे अचानक वाढले असे एक चित्र सध्या उभे केले जात आहे. हे खरे नाही. भ्रष्टाचार, घोटाळे हे आपल्याला नवीन नाही. म्हणून तर त्याला आळा घालायला १९६६ पासून लोकपाल बिलाची चर्चा सुरू झाली. मात्र माहितीच्या अधिकारामुळे  कोर्टात  आरोप सिद्ध होण्यासाठी लागणारे पुरावे मिळू लागले आणि त्या आधारे आपली न्यायालयेही सरकारला जाब विचारू लागली आणि भ्रष्ट मंत्री – अधिकारी यांच्या चौकश्या सुरू झाल्या. म्हणून आदर्श सोसायटी घोटाळा, राष्टकुल खेळातील कंत्राटे, २-जी स्पेक्ट्रम बाबतचे निर्णय, गोदावरी गॅसबाबतचे धोरण या सर्व गोष्टी वेगाने पुढे आल्या. गेल्या वर्षभरात पुढे येऊ शकल्या.
      याच काळात ‘राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती’कडे लोकपाल बिलाचा मसुदा चर्चेला होता. (ह्या समितीत अरूणा रॉय, जॉन ड्रेज सारखे आंदोलनकर्ते, तज्‍ज्ञ, हर्ष मंदर, सक्सेनांसारखे माजी प्रशासकीय अधिकारी, नरेन्द्र जाधव, एम.एस. स्वामिनाथ्‍न अशी मंडळी आहेत. समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत.)  त्याबाबत अनेक व्यक्ती- संघटनांशी विचार-विनिमय सुरू होता. त्यात अरविंद केजरीवालही होते. पुढे काही मतभेदांमुळे केजरीवाल त्या चर्चेतून बाहेर पडले व अण्णांबरोबर गेले.
         भ्रष्टाचाराबाबत समाजात असलेला राग यामुळे सामान्य लोकांनी पाठिंबा दिला. अण्णांनी माहितीच्‍या अधिकाराचा कायदा करून घेण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांनी प्रश्न हाती घेतल्यामुळे त्याला आणखी महत्व पाप्त झाले. केन्द्र सरकारने या सर्व प्रकरणात अटक झालेल्या मंत्र्यांबाबत व घोटाळ्यात गुंतलेल्या मुख्यमंत्र्याबाबत कडक धोरण घेतल्याने लोकपाल विधेयक येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.  अशा वातावरणात त्याचे महत्व एकदम वाढले आहे.
      येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारतर्फे विधेयक संसदेत मांडले जाईल. तो सरकारचाच मसुदा असेल. त्याबाबत सर्व पक्षांची बैठक ३ जुलै रोजी पंतप्रधानांनी घेतली. ह्या मसुद्यावर चर्चा होईल. त्यातील वेगवेगळया कलमांचा तपशील ठरेल, कदाचित संयुक्त संसदीय समितीकडे पाठविले जाईल. त्यात सगळ्यांचे मुद्दे घेऊन पुन्हा लोकसभेत, राज्यसभेत चर्चा करून दोन्ही सभागृहात मंजूरी मिळाल्यास राष्ट्रपतींकडे पाठविले जाईल व कायदा बनू शकेल.
प्रश्न ९ वाः यातून भ्रष्टाचाराला कितपत पायबंद बसेल ?
उत्तरः- लोकपाल हा काही चमत्कार घडविणार नाही. लोकपाल म्हणजे तटस्थ यंत्रणा असावी असे सगळे म्हणतात. तसे मग न्यायालयही तटस्थच यंत्रणा आहे. मात्र न्यायाधीश भ्रष्टाचारातून मुक्त आहेत, असे दिसत नाही.  तीही समाजातील एक व्यक्ती असते. त्यामुळे समाजात राजरोस भ्रष्टाचार व काही यंत्रणा मात्र पूर्ण तटस्थ, असे होऊ शकणार नाही.
       दुसरे, सिस्टेमिक भ्रष्टाचाराला यातून आळा कसा घालणार ? उदा. जर कायदाच असा बनविला की ज्यामुळे काही लोकांना खूप फायदा मिळेल व इतरांना मिळणार नाही, मग काय करायचे ? याचे उत्तर सोपे नाही. समाजातूनच त्याविरूद्ध वातावरणात तयार व्हायला पाहिजे. ठिक-ठिकाणी अशा धोरणांना विरोध करणारी राजकीय आंदोलने व त्यातून जरब तयार झाली तर तटस्थ यंत्रणेचा खूप उपयोग होऊ शकेल.
         नाहीतर भ्रष्टाचारच संपविण्याची कंत्राटे अण्णांना दिली जातील व त्यांनी किती जणांच्या विकेट घेतल्या इतक्या उथळपणे हा विषय चर्चिला जाईल. नुकतेच राज ठाकरेंनी असे एक कंत्राट देऊ केले आहे. ते अण्णांना उद्देशून जाहीर सभेत म्हणाले की, अण्णा, तुम्ही अजित पवार व भुजबळांची प्रकरणे बाहेर काढा, आम्ही तुम्हाला पूर्ण समर्थन देऊ.
       मग हे काम राज ठाकरेच का करीत नाहीत ? दुसरे, त्यांनी विकत घेतलेल्या कोहीनूर मिलच्या जागेत जे टॉवर बांधले, तिथे कायद्यानुसार कामगारांना (गिरणीत मराठी कामगारच अधिक होते)  घरे न देणे, हा भ्रष्ट व्यवहार आहे की नाही ?  त्यामुळे, समाजातील मोठा विभाग जो पर्यंत या विरोधात उतरत नाही, तोपर्यंत असलेल्या यंत्रणेचा उपयोग नीट होऊ शकणार नाही.
प्रश्न १० वाः लोकपाल मसुद्याबाबतच्‍या मतभेदांची थोडी माहिती.
उत्तरः- १) लोकपाल बाबत सरकार व अण्णांच्या टीमची काही मुद्दयांबाबत सहमती होऊ शकलेली नाही. उदा. पंतप्रधानांबाबत तक्रार लोकपालकडे करता आली पाहिजे असे टीमचे म्हणणे आहे,  तर पंतप्रधान निवृत्त झाल्यावर त्यांची चौकशी व्हावी असे सरकारला वाटते.
२) लोकपाल मंडळ किती व्यक्तींचे असावे, त्यांची निवड कुणी कशी करावी, त्यात ‘सिवील सोसायटी म्हणजे कोण माणसे जातील हा प्रश्न आहे.
3) न्यायालये, खासदार, अधिकारी, पंतप्रधान अशा सगळ्यांबाबतचे अधिकार एकाच व्यक्तीकडे देण्यात धोका संभवतो.  या बाबत टीम आग्रही आहे. सरकार न्यायालयीन  विधेयक आणून एक स्‍वतंत्र कायदा करण्‍याचा विचार करत आहे.
४) सी.बी.आय.चा आर्थिक गैरव्यवहार बघणारा विभाग लोकपाल मध्ये विसर्जित करावा अशी टिमची मागणी आहे. सरकारचे म्हणणे आहे की वेग-वेगळ्या यंत्रणा एकवटून एकाच व्यक्तीकडे अधिकार देणे लोकशाहीला मारक होऊ शकेल.
        असे अनेक मुद्दे आहेत. ज्यांना सर्व तपशील हवा आहे त्यांना तो उपलब्ध करून देता येईल.
प्रश्न ११वाः आपली भूमिका काय असावी ?
उत्तरः- आपली म्हणजे आम्ही चर्चा करायला जे बसलो होतो त्यांची भूमिका थोडक्यात इथे देत आहोत .
·                     ह्या प्रश्नाकडे कसे बघायचे, त्याबद्दलचा स्वतःचा दृष्टिकोण तयार करा. आमचा दृष्टिकोण थोडक्यात प्रश्नोत्तर रूपाने दिला आहे.
·                     आपण लोकशाही समाजव्यवस्थेत आहोत. या विधेयकातील ज्‍या गोष्टी लोकशाहीची ताकद वाढविणा-या आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. 
·                     भ्रष्टाचाराचे निमित्त करून संसदीय लोकशाही मार्गाने जाण्याऐवजी व्यक्तिस्तोम वाढविणे, व्यक्तिकेंद्रित अधिकार देणे याला आमचा निश्चित / ठाम विरोध आहे. अण्णा, रामदेवबाबा, किरण बेदी आपापल्‍या क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे आहेत, पण म्हणून त्यांचाच मसुदा सरकारने मानावा, नाहीतर ऑगस्ट मध्ये उपोषण करु, ही भूमिका आम्हाला अमान्य आहे.
·                     आपल्या ठिकाणी लोकांचे भ्रष्टाचाराविरूद्ध संघटन करणे, सामान्य लोकांना ताकद देणे हे लांब पल्ल्याचे काम सतत करावे लागणार आहे.

-अरविंद वैद्य, भारती शर्मा, सुरेश सावंत